पोथी
साइन इन

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय २०

अध्याय २०

अध्याय २०

अध्याय विसावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तट-विहारा देवा वरदपाणी धरा दासगणूच्या मस्तकी

तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हातीं मग माझी फजिती कां रे ऐसी मांडलीस ?

माझें पाप-ताप दहन करा कृपाकृशाने करून राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया

यांत अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणांस बट्टा लावून घेऊ नये

म्हणून हे श्यामसुंदरा राही-रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी

असो, समाधिस्थ झाल्यावर श्रीगजानन साधुवर म्हणूं लागले नारीनर आतां काय ह्या शेगांवीं

शेगांवीचा ज्ञानगभस्ती अस्ता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ

समुद्राचे आटल्या नीर वा, पुष्पतंरूंचा गेल्या भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये ?

आतां खेपा शेगांवात करणे आहे की निमित्त ? देव नसतां देव्हाऱ्यांत माळा बांधणे व्यर्थची

ऐसें कित्येक बोलती परी ती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठायां १०

जेवीं इंद्रायणीचे तीरीं ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठायीं भाविकां ११

तैशीच शेगांवात श्रीगजाननस्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धान्त दर्शन त्यांना तेथ होतें १२

ते विषयींची एक कथा सांगतो मी येथ आतां गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ १३

हा रायली कंपनीचा एजंट शेगांव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो १४

अस्तमानीं प्रती दिवशीं यावें त्याने मठासीं बैसोनिया समाधीपाशीं स्तवन करावें एकनिष्ठें १५